अमरावती, दि.८: संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अर्थात हयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी तातडीने हयात प्रमाणपत्र काढावे, अन्यथा त्यांचा मासिक लाभ बंद होऊ शकतो, असे तहसिलदार, संजय गांधी योजना शहर विभाग अमरावतीच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
लाभार्थी मोबाईलवर संबंधित अॅप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात तसेच तहसील कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
0 Comments