डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात
अमरावती, दि.११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) सुरु असून काल दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९९.९८% गणना अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे व डिजिटायझेशनचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यातील एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांपैकी २५ लाख ४५ हजार १८३ मतदारांपर्यंत हे अर्ज पोहोचवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघांपैकी धामणगाव रेल्वे, बडनेरा, दर्यापूर, मोर्शी आणि अचलपूरमध्ये अर्ज वितरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. अमरावती (९९.९९टक्के), मेळघाट (९९.९९ टक्के) आणि तिवसा (९९.८६ टक्के) या मतदारसंघांमध्येही वितरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख ८१ हजार ८९ गणना अर्ज गोळा करण्यात आले असून, गोळा झालेल्या सर्व अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे हे जिल्ह्यातील हे एकूण प्रमाण ८५.६८ टक्के आहे. धामणगावरेल्वे मतदार संघात डिजिटायझेशन ८६.८९ टक्के, बडनेरा ८२.६९ टक्के, अमरावती ७८.५८ टक्के, तिवसा ८३.३४ टक्के, दर्यापूर(अ.ज.) ९०.१६ टक्के, मेळघाट (अ.जा.) ८८.०१ टक्के, अचलपूर ८७.६७ टक्के,मोर्शी मतदार संघात ९०.६४% डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे.यानुसार १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेला येत्या १७ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी मतदार याद्यांची प्रारुप प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यानंतर २३ सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. २२ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
0 Comments