मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक
दि. ३१ अमरावती: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल अमरावती महानगरपालिकेत 'हुतात्मा दिन' अत्यंत गांभीर्याने आणि आदराने साजरा करण्यात आला. या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित या मुख्य कार्यक्रमात मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आयुक्तांच्या उपस्थितीत महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११:०० वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांच्या स्मृतीला उजाळा दिला.
आयुक्तांनी यावेळी महात्मा गांधींच्या अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले.
शहरातील इतर शासकीय कार्यालयांमध्येही याच प्रकारे हुतात्मा दिन पाळण्यात आला.
Post a Comment
0 Comments