Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आणिबाणीतील मानधनधारकांच्या कायम पाठीशी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


*जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन, सन्मानपत्राचे वितरण

अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : आणिबाणीच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काल दि. २५ जून ला  कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला. येत्या काळात आणिबाणीतील प्रत्येक नागरिकाशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच प्रशासनाकडे काही समस्या असल्यास भेट घ्यावी. या समस्या निकाली काढण्यासाठी आणिबाणीतील मानधनधारकांच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, ज्ञानेश्वर घ्यार, तहसिलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघन, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह आणिबाणीतील मानधनधारक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देशातील १९७५  ते १९७७ दरम्यान आणिबाणी काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते आज फित कापून करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणिबाणीतील मानधनधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्यात आले.

आणिबाणी काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आल्या आणि प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादली गेली. याबाबत आवाज उठवणाऱ्या अनेक व्यक्तींना तुरुंगवास झाला. यानिमित्ताने जिल्हा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आणिबाणीतील मानधनधारक यांचा सन्मान करण्यात आला. भावना जिचकार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


Post a Comment

0 Comments