Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

"राज्यातील १.७५ कोटी महिलांनाच मिळणार लाभ; अपात्र आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या ६८ लाख बहिणींची खाती तूर्तास बंद"

  • लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केल्यामुळे राज्यातील सुमारे ६८ लाख लाभार्थ्यांची खाती बंद करण्यात आली आहेत. 
  • महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. ज्या महिलांनी ३१ मार्च २०२६ या निर्धारित मुदतीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांची खाती तात्पुरती निष्क्रिय  करण्यात आली आहेत.
  • अपात्र लाभार्थ्यांची छाटणी: चौकशी दरम्यान काही पुरुष अर्जदार, सरकारी कर्मचारी आणि चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तींनाही लाभ मिळत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केवळ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी ही पडताळणी मोहीम राबवण्यात आली.
  •  या कारवाईनंतर राज्यातील एकूण २.४३ कोटी खात्यांपैकी आता केवळ १.७५ कोटी खाती सक्रीय उरली आहेत. 
  • महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की, ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे किंवा वेळेअभावी प्रलंबित आहेत, त्यांना आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे.
  • खाती पुन्हा सुरू होणार: जर एखाद्या पात्र महिलेचे खाते बंद झाले असेल, तर ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण केल्यावर तिचे खाते पुन्हा सक्रीय केले जाईल आणि योजनेचे हप्ते नियमितपणे जमा होतील.
  • या निर्णयामुळे सरकारच्या मासिक खर्चात सुमारे ३,७०० कोटी रुपयांची बचत होत असली, तरी जास्तीत जास्त पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Post a Comment

0 Comments