Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

"हिंदवी स्वराज्य: शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा अनमोल ठेवा"



  • "युगप्रवर्तक शिवराय: एक आदर्श प्रशासक आणि व्यवस्थापन गुरू"
    स्वराज्याची संकल्पना:-
      शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ सत्तांतर नव्हते, तर तो 'रयतेचे राज्य' निर्माण करण्याचा प्रयत्न होता . जात, धर्म आणि पंथ विसरून मानवी मूल्यांची जोपासना करणे हे त्यांच्या स्वराज्याचे मुख्य सूत्र होते .
  • व्यवस्थापन गुरू: आधुनिक काळातील व्यवस्थापन शास्त्र (Management Science) महाराजांच्या रणनीतीमध्ये ३५० वर्षांपूर्वीच दिसून येते . गनिमी कावा, मर्यादित संसाधनांचा अचूक वापर आणि अष्टप्रधान मंडळाद्वारे केलेले विकेंद्रित प्रशासन आजही अभ्यासाचा विषय आहे.
  • आरमार आणि संरक्षण धोरण: त्यांना 'भारतीय नौदलाचे जनक' म्हटले जाते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वतंत्र आरमार उभारले आणि अरबी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले.
  • शेतकरी आणि महिलांचा सन्मान: महाराजांच्या आज्ञापत्रात स्पष्ट नमूद होते की, "सैनिकांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये". परस्त्रीला मातेसमान मानण्याचे संस्कार त्यांनी आपल्या सैन्यावर बिंबवले होते 
  • किल्ले - स्वराज्याचे आधारस्तंभ: महाराजांचे गडकिल्ले ही केवळ बांधकामे नसून ते स्वराज्याचे अभेद्य कवच होते . नुकतेच हे किल्ले 'जागतिक वारसा' (UNESCO World Heritage) च्या प्राथमिक यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत .
  • छत्रपती शिवाजी महाराज – व्यवस्थापन गुरू
  • शिवाजी हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते एक साहसी व्यक्तिमत्व, हुशार, शूर, एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक. महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले. एक उत्कृष्ट योद्धा, एक आदर्श शासक, सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून मराठी साम्राज्याचा संस्थापक भारताच्या इतिहासावर आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला.
  • अशा या महान राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्रातील मराठा राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, लोककल्याणकारी धोरणे, परकीय शक्तींना वश करण्याची क्षमता, कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि धाडस यामुळे ते आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत.छत्रपती शिवाजी महाराज हे महान नेते आणि उत्तम व्यवस्थापक तर होतेच पण त्यांचे चारित्र्यही उत्तम होते. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक महान संघटन संस्कृती निर्माण केली, ज्याच्या बळावर त्यांच्यानंतरही मराठा साम्राज्य मजबूत राहिले.
  • शिस्त आणि लवचिकता हे त्यांच्या नेतृत्वाचे दोन महत्त्वाचे पैलू होते. त्यांचा प्रत्येक निर्णय, त्यांची प्रत्येक मोहीम शिस्तबद्ध होती. स्वराज्य वाचवण्यासाठी वेळोवेळी काही पावले मागे घेण्याची लवचिकताही त्यांच्या नेतृत्वात होती. मुघलांशी तह करून त्यांना 23 किल्ले देऊन स्वराज्यावरून त्या वेळी निर्माण झालेले वाद टाळले. पण कालांतराने त्यांनी सर्व किल्ले मुघलांकडून परत मिळवले. आजूबाजूला असे बलाढ्य शत्रू असताना आणि लोकांचे मनोधैर्य खचलेले असताना स्वराज्याचे स्वप्न पाहणे हे धाडस होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टीने वाटचाल करणे आवश्यक होते. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचे महान स्वप्न पाहत असताना वास्तवाचे पूर्ण भान ठेवून आपल्यातील कमतरता/शक्ती/संभाव्य संधी इत्यादींचे अचूक विश्लेषण केले होते. या सर्व गोष्टींचा त्यांनी अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्याआधारे त्यांनी हळूहळू काटेकोर रणनीती तयार करून स्वराज्य स्थापनेकडे वाटचाल सुरू केली.
  • रयतेचे कल्याण या एकाच विचारसरणी वर आधारित स्वराज्य उभे करण्यासाठी शिवरायांनी दूरदृष्टीने विविध प्रकारच्या यंत्रणा उभ्या केल्या (जसे कि गुप्तचर यंत्रणा), त्यांनी समाजातील सर्व थरातील लोकांना सामावून घेतले, संसाधने जमवली, नवीन किल्ले बांधले, जुने किल्ले बळकट केले. प्रसंगी आरमार निर्मितीसाठी पोर्तुगीजांची मदत घेतली, इंग्रजांच्या वेगळ्या चलनाच्या मागणीला फेटाळून लावले. ध्येयापर्यंतच्या प्रवासातील अनिश्चितता माहीत असूनही त्यांनी आव्हानांचा सामना केला आणि स्व-व्यवस्थापनाचे स्वप्न साकार केले.
  • अध्यात्मिक अर्थव्यवस्थेमध्ये दुर्बलांना संरक्षण – प्राधान्य – आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य याच तत्वावर आधारित होते. अनेक दुर्बल आणि मागासलेल्या जातींमधून शिवराय लोकांची निवड करत, त्यांना साचेबद्ध करत आणि त्यांना स्वराज्य उभारणीच्या कामात सामील करत असत. किशोरवयात सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांना रयतेची खरी स्थिती कळली होती. मग त्यांनी आपले सहकारी निवडले आणि त्यांनाही घडवले.
  • सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी देऊन ​​त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांची काळजी घेतली. धार्मिक ढोंग बाजूला ठेवून त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आत्मसातीकरणावर आणि काळाच्या विकासावर भर दिला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले भारतीय आरमार उभारणारे भारतीय राजा म्हणून इतिहासात नोंदवले गेले आहेत . महाराजांनी आवश्यक तेव्हा धाडसी निर्णय घेतले. स्वराज्यातील सुशासन आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देत आध्यात्मिक अर्थकारण आणि त्यांच्या कर्मयोगाच्या आधारे महाराजांनी कल्याणकारी राज्य उभारले.
  • शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या सर्व लढाया या व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहेत. हवामान, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थितीचा अभ्यास करून लष्करी रणनीती ते ठरवत असत. त्यांच्या कौशल्याच्या आधारे मावळ्यांची निवड आणि सैन्यात नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यातून त्यांचे कार्य दिसून येते. जात, पंथ, भाषा, प्रांत या अस्मिता दूर करून मावळ्यांमध्ये स्वराज्याची तीव्र इच्छा आणि आकांक्षा निर्माण करणारे नेते म्हणजे शिवाजी महाराज.




Post a Comment

0 Comments