प्रिय वाचकांनो,
भारताची सागरी परंपरा प्राचीन आणि गौरवशाली राहिली आहे. याच ऐतिहासिक वारशातून प्रेरणा घेऊन आज भारत आपल्या सागरी क्षेत्राला आधुनिक विकासाच्या एका नवीन टप्प्यावर घेऊन जात आहे. सुमारे ११ हजार किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि जागतिक सागरी मार्गांवरील धोरणात्मक स्थितीमुळे भारताकडे अफाट संधी उपलब्ध आहेत. १२ प्रमुख बंदरे आणि २१७ इतर बंदरांसह, सागरी वाहतूक आजही भारतीय अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे. गेल्या ११ वर्षांत या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. 'इंडिया व्हिजन २०३०' अंतर्गत भारताला जगातील एक अग्रगण्य सागरी शक्ती आणि जहाज बांधणी करणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने कार्यरत आहे.
न्यू इंडिया समाचार (अंक १-१५ एप्रिल, २०२६) ची 'कव्हर स्टोरी' (मुख्य लेख) ‘महासागर बनत आहेत संधींचा सेतू’ या विषयावर आधारित आहे. हे 'पोर्ट फॉर प्रॉस्पेरिटी' (समृद्धीसाठी बंदरे), 'पोर्ट फॉर प्रोग्रेस' (प्रगतीसाठी बंदरे) आणि 'पोर्ट फॉर प्रॉडक्टिव्हिटी' (उत्पादकतेसाठी बंदरे) या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला (व्हिजनला) अधोरेखित करते.
त्याचबरोबर, 'व्यक्तित्व' या सदरामध्ये बाबू जगजीवन राम आणि १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ राष्ट्राने त्यांना केलेल्या अभिवादनावर आधारित विशेष सामग्रीचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. मला आशा आहे की हा अंक तुम्हाला नक्कीच आवडेल.
ई-न्यू इंडिया समाचारचा नवीनतम अंक हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त ११ भारतीय भाषांमध्येही उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या भाषेच्या लिंकवर क्लिक करून हा अंक सहज वाचू शकता.
शुभेच्छा आणि आभार!
Post a Comment
0 Comments