Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

क्वांटम तंत्रज्ञान भविष्यातील सर्वात मोठे गेमचेंजर - प्रा.उमांकांत रापोल

 

 

प्रा.उमांकांत रापोल



मुंबई
दि. १६ : क्वांटम तंत्रज्ञान हे पुढील काही वर्षात जगभरात मोठा बदल घडवून आणणारे क्षेत्र ठरणार आहे. क्वांटम मेकॅनिक्स समजणे अवघड आहेहे केवळ सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर महान शास्त्रज्ञांनाही आव्हान ठरल्याचे आयशर (आयआयएसईआरपुणे येथील प्रा. उमाकांत रापोल यांनी सांगितले.

 

जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालय येथे आयोजित परिषदेत पहिल्या विशेष सत्रात प्रा. उमांकांत रापोल यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्वत्यातील मूलभूत संकल्पना आणि भविष्यातील परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवालमाहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंगमहाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

प्रा. रापोल यांनी सांगितले कीसध्या जग दुसऱ्या क्वांटम क्रांतीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पहिल्या क्वांटम क्रांतीतून इलेक्ट्रॉनिक्ससेमीकंडक्टरएमआरआय यासारख्या तंत्रज्ञानांचा विकास झालातर दुसऱ्या टप्प्यात क्वांटम संगणसुरक्षित संप्रेषण प्रणाली आणि अत्यंत अचूक सेन्सर्स विकसित होत आहेत.

 

क्वांटम संगणणांची कार्यपद्धती स्पष्ट करताना त्यांनी ‘क्युबिट’ ही संकल्पना मांडली. पारंपरिक संगणकात माहिती ‘०’ किंवा ‘१’ स्वरूपात साठवली जातेतर क्युबिटमध्ये दोन्ही अवस्थांचे एकत्र अस्तित्व शक्य असल्याने माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता घातांकी प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सुपरपोजिशन व इनटँगलमेंट या संकल्पना क्वांटम तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. एंटँगलमेंट संदर्भात त्यांनी उदाहरण दिली. केंद्र शासनाने सुरू केलेल्या सुमारे 6000 कोटी रुपयांच्या ‘नॅशनल क्वांटम मिशन’चा उल्लेख करत त्यांनी सांगितले कीदेशात संशोधनस्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान विकासाला मोठी चालना मिळत आहे. पुणे-मुंबई परिसरात मजबूत संशोधन परिसंस्था तयार होत असून महाराष्ट्रही क्वांटम मिशन सुरू करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

 

क्वांटम तंत्रज्ञानाचे उपयोग स्पष्ट करताना त्यांनी सांगितले कीऔषधनिर्मिती व आरोग्य क्षेत्रात जलद संशोधनअत्यंत सुरक्षित डिजिटल संप्रेषणजीपीएसशिवाय अचूक नेव्हिगेशनभूगर्भातील पाणी व खनिजांचा शोध आणि अत्याधुनिक सेन्सर्स व अणुघड्याळे या सर्व क्षेत्रांत क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत.

 

जगभरात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होत असताना भारतानेही वेळेत पावले उचलली आहेत. आता संशोधनाबरोबरच स्थानिक तंत्रज्ञान विकास आणि कौशल्यनिर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे प्रा. रापोल यांनी सांगितले.


Tags

Post a Comment

0 Comments