दि. ११, पणजी, गोवा :-
पणजी, गोवा येथे ८ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या (CPA) विभाग-७ (महाराष्ट्र, गोवा, गुजरात) च्या पहिल्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपले विचार मांडले
ही परिषद विकसित भारत - २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विधिमंडळातील तरुण सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण व सागरी संपर्क या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती
सहभागी मान्यवर: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे संबोधन:
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात विशेषतः महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासावर भर दिला
महिला सक्षमीकरण: विकासाच्या संकल्पनेत लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले
शाश्वत विकास: व्यापार, पर्यटन आणि शहरीकरण या क्षेत्रांमध्ये महिलांच्या सहभागामुळे प्रगतीला वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
लोकसभा अध्यक्षांचे स्वागत: परिषदेसाठी आलेल्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पणजी येथे स्वागत केले होते .
Post a Comment
0 Comments