Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कृषी पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदत वाढ

 

 


ऑनलाइन प्रस्ताव https://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध

 

 अमरावती, दि. २ : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्नवसंतराव नाईक कृषिभूषणजिजामाता कृषिभूषणवसंतराव नाईक शेतीमित्रवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरीउद्यानपंडित पुरस्कारकृषिभूषण (सेंद्रिय शेती)युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते.

 

            यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी व आवश्यक कागदपत्र जमा करणेसाठी होणारा त्रास व लागणारा खर्च यामुळे सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण,पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभवेळबद्धपारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.inकृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.

 

या  संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरणतपासणीमूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमताविश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.

 

            इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेची अंतिम मुदत दि.३१ मार्च २०२६ होती. परंतु online प्रणालीचे पहिलेच वर्ष तसेच  शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास लागणारा कालावधी  या कारणास्तव काही  अर्ज शेतकरी स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शेतकरी स्तरावरून व क्षेत्रीय स्तरावरून सदरची मुदत वाढवून मिळणेबाबत होत असलेल्या मागणीच्या  अनुषंगाने सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेस कृषी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली असून अंतिम मुदत दि.१५ एप्रिल २०२६ करण्यात येत आहे .तरी इच्छुक शेतकऱ्यांनी वरील नमूद  मुदतीत अर्ज  करण्याबाबतचे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

 

            या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी विविध कृषी पुरस्कार बाबतचे त्यांचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणाली द्वारे कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर १५ एप्रिल पर्यंत सादर करावे, असे आवाहन कृषी संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Post a Comment

0 Comments