Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

वन्यप्राण्यांचा केळीबनात धुमाकूळ; शिरसगाव कसब्याचा बळीराजा संकटात!


"शिरसगाव शिवार हादरले! वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त."

दि. ०६  शिरसगाव कसबा: (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शिरसगाव कसबा येथील परिसरात वन्यप्राण्यांनी शेती शिवारात धुमाकूळ घातला असून, प्रामुख्याने केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शिरसगाव कसबा आणि आसपासच्या शेतशिवारात शेकडो वन्यप्राणी वावरत असल्याची चर्चा असून, यामुळे हातातोडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
केळीच्या बागांचे अतोनात नुकसान
परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केळीच्या बागा जोपासल्या आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी 
रानडुकरे
, रोही (नीलगायी) आणि 
हरीण
 यांसारख्या प्राण्यांचे कळप बागांमध्ये शिरून झाडांची पडझड करत आहेत
. अनेक ठिकाणी केळीचे खांब उपटून फेकल्याने आणि पाने फस्त केल्याने बागांचे होत्याचे नव्हते झाले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
शेकडो वन्यप्राणी उघडपणे शेती परिसरात वावरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी पिका राखणीसाठी जाणेही आता धोक्याचे बनले आहे. "दिवसभर राबून आणि कर्ज काढून उभ्या केलेल्या बागा डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहेत," अशी आर्त हाक स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. राज्यात दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे शेतीचे १० हजार कोटी ते ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
वन विभागाकडून कुंपण योजना राबविल्यास पिके सुरक्षित राहणार 
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीवर प्रभावी उपाय म्हणून वन विभागाने सौरऊर्जेवर आधारित मजबूत संरक्षक कुंपण योजना तातडीने राबविणे गरजेचे आहे.यांमुळे वन्यप्राण्यांचा शेतात प्रवेश रोखता येऊन केवळ तक्रार पुरते मर्यादित न राहता पाहणी करून संवेदनशील भागात प्राधान्याने कुंपण उभारणीसाठी पुढाकार घ्यावा.यामुळे पीक नुकसानीत निश्चितच घट येऊ शकते,अशी मागणी शेतकरी करीत आहे.
वनविभागाकडे मदतीची मागणी
या वाढत्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाने तातडीने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने योग्य भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी शिरसगाव कसबा परिसरातील शेतकरी करत आहेत. केंद्र सरकारने आता प्रधानमंत्री फसल बीमा योजने (PMFBY) अंतर्गत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश 'अ‍ॅड-ऑन कव्हर' म्हणून केला आहे, ज्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो.

Post a Comment

0 Comments