अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 21 मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित काल जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments