चांदूरबाजार दि. २७ :- वाढत्या उष्णतेमुळे आणि उष्माघाताचा (Heatwave) धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शाळेची नवीन वेळ: चांदूरबाजार तालुक्यातील सर्व शाळा आता सकाळी ७ ते १० या वेळेतच भरतील. सकाळी १० नंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश जिल्हा परिषदेच्या शाळांसह सर्व माध्यमांच्या खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना लागू आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदूरबाजारसह जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३-४४ अंशांच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या तीव्र उन्हाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.
खाजगी शिकवणी (Tution Classes): दुपारच्या कडक उन्हात खाजगी क्लासेस चालवल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने खाजगी शिकवणी चालवणाऱ्यांनाही सकाळच्या सत्रातच क्लासेस घेण्याचे आवाहन केले आहे
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उर्वरित तासिका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याचे सुचवण्यात आले आहे.
शाळांमध्ये पिण्याचे पुरेसे पाणी, सावलीची सोय आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.
Post a Comment
0 Comments