कारने बाईकस्वारांना चिरडले, चौघांचा जागीच मृत्यू
दि. २२ अंबरनाथ, [ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क]:
अंबरनाथ शहरात काल रात्री उशिरा एक थरकाप उडवणारा रस्ते अपघात घडला. शहरातील मुख्य उड्डाण पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील तरुण हवेत फेकले गेले आणि जागीच गतप्राण झाले. अपघातग्रस्त दुचाकी आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.
या अपघातामुळे अंबरनाथ शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. अतिवेगामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments