अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पुर्ण न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या अ संकेतस्थळावरुन अर्ज डाउनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६. १५ वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे-०१ येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments