Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माई सिंधुताई सपकाळ माझ्यासाठी आदर्श होत्या - आचार्य डॉ. कमलताई गवई


 माई सिंधुताई सपकाळ माझ्यासाठी आदर्श होत्या

 
 माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई गवई यांचे प्रतिपादन
 
सावित्रीबाई फुले जयंती व सिंधुताई सपकाळ पुण्यतिथीनिमित्त चिखलदरात करुणेचा जागर
   

माईंच्या आठवणींनी डोळे पाणावलेसमाजसेवेची नवी शपथ

 

 

चिखलदरादि. ६ जानेवारी / (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) : “सिंधुताई माझ्यासाठी केवळ समाजसेविका नव्हत्यात्या माझ्या आयुष्याचा आदर्श होत्या. समाजातील निराधार लेकरांसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झिजवले. त्यांच्या डोळ्यांत माणुसकी होती आणि हृदयात अमाप करुणा होती. त्या आज नाहीतपण त्यांच्या विचारांनी मला आजही काम करायला भाग पाडले आहे.”  “माई ज्या भावनेतून मेळघाटात आल्याज्या दुर्गम भागातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केलेती ठिणगी आज मोठ्या ज्वालासारखी पेटलेली आहे. माईंचे स्वप्न अपूर्ण राहू देणार नाहीहीच आजची खरी श्रद्धांजली आहे,” असे माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई गवई यांनी ठाम शब्दांत सांगितले. मार्गदर्शन करताना डॉ. कमलताई रामकृष्ण गवई यांचा स्वरही भावनांनी भरून आला.

 

माईंच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आणि सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधूनपद्मश्री सौ. सिंधुताई सपकाळ जनविकास सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनपुणे शाखा चिखलदरा यांच्या वतीने आयोजित पुष्पांजली कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम नव्हतातर माईंच्या आठवणींनी भरलेला एक भावनिक प्रवास ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री व माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई रामकृष्ण गवई होत्या. सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताच संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले. जणू माई स्वतः तिथे उपस्थित असल्याचा भास उपस्थितांना होत होता.  त्या बोलतांना पुढे म्हणाल्या की, 'चिखलदरा ही माईंची कर्मभूमी. इथूनच त्यांनी आदिवासी मुलींसाठी पहिली आश्रमशाळा सुरू केली. जिथे शिक्षणाचा प्रकाश कधी पोहोचलाच नव्हतातिथे माईंनी आशेचा दिवा लावला. आजही त्या शाळेतून शिकणाऱ्या मुली माईंच्या स्वप्नाची साक्ष देत आहेत. यावेळी माईंचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ यांनी भावूक होत सांगितले, “आई शारीरिक स्वरूपात आज आमच्यात नाहीपण तिचे कार्य पुढे नेणे हीच माझी जबाबदारी आहे. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.” या कार्यक्रमात जिल्हा सत्र न्यायाधीश प्रभाकर मोडकमाजी आयकर आयुक्त पियुष कोल्हेतसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माईंच्या मातृत्वसंघर्ष आणि समाजसेवेवर मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार केवलराम काळेनागपूरचे  माजी आ. प्रभूदास भिलावेकरगुगामल राष्ट्रीय उद्यानाच्या उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे,  वॉरंट ऑफिसर एअर फोर्स सुनील मानकरनगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदरअभिमान डोईजडधर्मराज खडकेराजू करंडेमार्तंड नेवासकरजेष्ठ पत्रकार मोहम्मद अश्रफभाईअधीक्षिका सरिता सपकाळ, प्रसाद सपकाळ, सौ. जान्हवी सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.दोन दिवसीय कार्यक्रमात वक्तृत्वकविता वाचनगीत गायनअनुभव कथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने हेलावून टाकली. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदान आणि सिंधुताईंच्या संघर्षमय आयुष्याचा संदेश प्रत्येक मनात खोलवर रुजला.

 

चौकट

चिखलदरातून सिंधुताईंच्या विचारांचा अखंड प्रवास सुरूच...

माई गेल्यापण माईंची माया अजून जिवंत आहेचिखलदरातून सिंधुताईंच्या विचारांचा अखंड प्रवास सुरूच आहे. माई सिंधुताई सपकाळ आज हयात नाहीतपण ज्या हातांनी त्यांनी अनाथांना मायेची ऊब दिलीती ऊब आजही जिवंत आहे. माई गेल्या नाहीतत्या हजारो लेकरांच्या हसण्यातशिक्षणात आणि माणुसकीत आजही जिवंत आहेत. त्यांचे कार्य चालू आहे आणि तेच समाजासाठी आशेचे खरे दालन आहेअशी भावना या कार्यक्रमात उमटली. काळाच्या पडद्याआड गेलेली एक माणुसकी आजही जिवंत आहे. आई नसतानाही हजारो लेकरांना मायेसारखी कवेत घेणारी पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) आज हयात नाहीत. पण ज्या हातांनी त्यांनी अनाथांच्या अश्रूंना पुसलेत्या हातांचे कार्य आजही थांबलेले नाही. माईंचे शरीर नाहीपण त्यांची मायात्यांचे विचार आणि त्यांचे स्वप्न आजही चिखलदरातून समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत आहे.


Post a Comment

0 Comments