दि.९ बहिरम (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-
विदर्भाचा मानबिंदू आणि विदर्भकेसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध आणि ४० दिवस चालणाऱ्या बहिरम यात्रेला येत्या २० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, प्रशासनासमोर यात्रेकरूंना मूलभूत सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान आहे
ही यात्रा साधारणपणे दीड महिना किंवा ४० दिवस चालते आणि महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशातील लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.या यात्रेत पारंपरिक दुकाने, खानावळी आणि मनोरंजनपर खेळ (झुले, पाळणे, टॉकीज) असतात.
या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मातीच्या हंडीत शिजवलेली भाजी, रोडगे आणि मटण. खवय्ये या विशिष्ट चवीचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून येतात.
गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने 'तमाशामुक्त' करून त्याऐवजी शंकरपट व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची अडचण भासते; 'आरओ' मशीन किंवा नवीन पाण्याची टाकीची व्यवस्था अपूर्ण आहे
शौचालये अपुरी असून, स्वच्छतेच्या अभावामुळे अस्वच्छता, दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो विशेषतः रात्रीच्या वेळी हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत अपेक्षित कचरा पेट्या, 'डोअर टू डोअर' कचरा कलेक्शन किंवा घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधांचा अभाव आहे
अवैध धंदे आणि भांडण-तंट्यामुळे उद्भवणारे वाद टाळण्यासाठी सतत पोलीस गस्त आणि सुव्यवस्थित जागावाटप आवश्यक आहे
.यात्रेकरूंसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि शौचालयांची व्यवस्था अपुरी असल्याचे आव्हान प्रशासनासमोर नेहमीच असते, मात्र यंदा तरी या सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.
प्रशासकीय आव्हान: लाखो भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि स्वच्छ व्यवस्थापन करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. यात्रेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखने तसेच यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी सतत पोलीस गस्त आणि अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे
स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, यंदा तरी भाविकांची गैरसोय टाळून सुरक्षित यात्रा घडवण्यासाठी प्रशासनाने ठोस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments